महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख केंद्रबिंदू समजला जाणारा 'माधवं' फॅक्टर!
यांना एकत्रित करून यांची वज्रमुठ बांधण्याचं काम मुंडे साहेबांनी केले. याच वज्रमुठीच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे अनेकवेळा बदलली. हक्कांच्या गोष्टीपासून नेहमी वंचित राहिलेल्या धनगर माळी व वंजारी समाजाचा मतदानापूरता वापर करून घेणाऱ्या विरोधचा रोष पाहून मुंडे साहेबांनी या तिन्ही वंचित समाजाचे नेतृत्व करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गल्ली ते दिल्ली यशस्वी प्रयत्न केले. याच कारणांमुळे या तिन्ही समाजाचं एकहाती नेतृत्व साहेबांकडे होते...!
कालांतराने वंजारी, धनगर आणि माळी समाजाला एक अतूट बंधनात बांधून व इतर घटकपक्षांना सोबत घेऊन मुंडे साहेबांनी २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तापरिवर्तन करून दाखवले..
महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या १ कोटी २५ लाख आहे तर वंजारी समाजाची लोकसंख्या ४० ते ५० लाख आह.े तसेच माळी समाजाची लोकसंख्या अंदाजे १ कोटीच्या घरात आहे..
२८८ मतदारसंघापैकी १०० मतदारसंघात धनगर,वंजारी आणि माळी समाजाचे वर्चस्व आहे.१०० मतदारसंघात काही ठिकाणी धनगर तर काही ठिकाणी वंजारी आमदार निवडून येऊ शकतो. तर काही ठिकाणी माळी समाजाचा आमदार निवडून येऊ शकतो, हा तिन्ही समाज मिळुन जे ठरवेल तोच आमदार होऊ शकतो या गोष्टींचा सखोल अभ्यास करून मुंडे साहेबांनी राजकारणाच्या सुरुवातीपासूनच या तिन्ही समाजाला एकत्रित करण्याचे काम केले व त्यांची वज्रमुठ तयार केली...!
यासाठी त्यांना मदत झाली ते माळी समाजाचे नेते म्हणुन ओळख असेलेले छगन भुजबळ साहेबांची! इतर वेळी परस्परविरोधी असलेले हे दोन नेते समाजाच्या उपस्थित प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नेहमी एकत्र येताना कित्येकवेळा पाहायला मिळालेले होते प्रस्थापित सरकारच्या विरोधात जाऊन छगन भुजबळांनी सत्तेत राहून मुंडे साहेबांना अनेकवेळा साथ दिलेली होती.....!
कालांतराने वंजारी, धनगर आणि माळी समाजाला एक अतूट बंधनात बांधून व इतर घटकपक्षांना सोबत घेऊन मुंडे साहेबांनी २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तापरिवर्तन करून दाखवले..
महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या १ कोटी २५ लाख आहे तर वंजारी समाजाची लोकसंख्या ४० ते ५० लाख आह.े तसेच माळी समाजाची लोकसंख्या अंदाजे १ कोटीच्या घरात आहे..
२८८ मतदारसंघापैकी १०० मतदारसंघात धनगर,वंजारी आणि माळी समाजाचे वर्चस्व आहे.१०० मतदारसंघात काही ठिकाणी धनगर तर काही ठिकाणी वंजारी आमदार निवडून येऊ शकतो. तर काही ठिकाणी माळी समाजाचा आमदार निवडून येऊ शकतो, हा तिन्ही समाज मिळुन जे ठरवेल तोच आमदार होऊ शकतो या गोष्टींचा सखोल अभ्यास करून मुंडे साहेबांनी राजकारणाच्या सुरुवातीपासूनच या तिन्ही समाजाला एकत्रित करण्याचे काम केले व त्यांची वज्रमुठ तयार केली...!
यासाठी त्यांना मदत झाली ते माळी समाजाचे नेते म्हणुन ओळख असेलेले छगन भुजबळ साहेबांची! इतर वेळी परस्परविरोधी असलेले हे दोन नेते समाजाच्या उपस्थित प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नेहमी एकत्र येताना कित्येकवेळा पाहायला मिळालेले होते प्रस्थापित सरकारच्या विरोधात जाऊन छगन भुजबळांनी सत्तेत राहून मुंडे साहेबांना अनेकवेळा साथ दिलेली होती.....!
सुरुवातीच्या काळात बी.के.कोकरे धनगर समाजातील आक्रमक अभ्यासु तरुण चेहरा धनगर समाजाला इतर मागासवर्गीय वर्गातून वगळून अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेश करून घेण्यासाठी राज्यसरकार विरोधात लढा देत होता. त्याच काळात बी.के.कोकरे यांच्या नेतृत्वाखाली किमान चार ते पाच लाख धनगर समाजाचा मोर्चा नागपूरला अधिवेशनाच्यावेळी काढण्यात आला त्याचे फलित म्हणुन तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवारांनी धनगर समाजाला भटक्या जमातीचा(एनटी) दर्जा देत सवलती लागू केल्या गेल्या....!
१९८९-९० साली पंतप्रधान व्ही. पी.सिंग यांनी देशात ओबीसी लोकांना २७% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.या निर्णयाला उचवर्णीयांचा खासकरून भाजप-शिवसेना या पक्षांनी मोठा विरोध केला यावरून त्यावेळी देशात,राज्यात राजकीय व सामाजिक ध्रुवीकरण झाले त्याचवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे आमदार असलेले माळी समाजाचे नेते छगन भुजबळ व भाजपाचे आमदार असेलेले बहुजन समाजाचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब या दोन्ही नेत्यांनी दबाव टाकत मंडळ आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू करून घेतल्या या शिफारशी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले यात मुंडे भुजबळ या जोडीचे महत्वाचे योगदान होते....!
त्यानंतर बऱ्याच वर्षापासून स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत असलेल्या वंजारी समाजाला मुंडे साहेबांनी सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र आरक्षण देत वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमातीच्या (एनटी ड) सवलती लागू केल्या... .!
१९८९-९० साली पंतप्रधान व्ही. पी.सिंग यांनी देशात ओबीसी लोकांना २७% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.या निर्णयाला उचवर्णीयांचा खासकरून भाजप-शिवसेना या पक्षांनी मोठा विरोध केला यावरून त्यावेळी देशात,राज्यात राजकीय व सामाजिक ध्रुवीकरण झाले त्याचवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे आमदार असलेले माळी समाजाचे नेते छगन भुजबळ व भाजपाचे आमदार असेलेले बहुजन समाजाचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब या दोन्ही नेत्यांनी दबाव टाकत मंडळ आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू करून घेतल्या या शिफारशी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले यात मुंडे भुजबळ या जोडीचे महत्वाचे योगदान होते....!
त्यानंतर बऱ्याच वर्षापासून स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत असलेल्या वंजारी समाजाला मुंडे साहेबांनी सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र आरक्षण देत वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमातीच्या (एनटी ड) सवलती लागू केल्या... .!
बी.के.कोकरे यांच्या पश्चात मुंडे साहेबांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा याची मागणी उचलून धरत त्या संदर्भात आक्रमक पवित्रा अवलंबून सरकारला धारेवर धरायचे कार्य केले.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा मुद्धा साहेबांनी उचलून धरला त्यासाठी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करत केंद्र सरकार व राज्य सरकारला वेठीस धरले पण तत्कालीन राज्य सरकारने म्हणजेच (राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस) यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहत तशी शिफारस केंद्र सरकारकडे करत धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या विषयाला स्थगिती मिळवली....!
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना मिळालेल्या विजयात मुंडे साहेबांचे मोलाचे योगदान होते, याचमुळे त्यांच्या अनुभवी आणि विकासनशील विचारांचा जनतेला फायदा करून देण्यासाठी मोदींनी त्यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्री बनवले केंद्रात सत्ता आल्यानंतर साहेबांनी सुरुवातीलाच धनगर आरक्षणाचा मुद्धा हाती घेत त्यासाठी आवश्यक गोष्टींच्या तरतुदी करण्यास सुरुवात केली पण दुर्दैवाने साहेबांचे अपघाती निधन झाले आणि परत धनगर आरक्षणाचा प्रश्न रखडला गेला.....!
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा मुद्धा साहेबांनी उचलून धरला त्यासाठी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करत केंद्र सरकार व राज्य सरकारला वेठीस धरले पण तत्कालीन राज्य सरकारने म्हणजेच (राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस) यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहत तशी शिफारस केंद्र सरकारकडे करत धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या विषयाला स्थगिती मिळवली....!
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना मिळालेल्या विजयात मुंडे साहेबांचे मोलाचे योगदान होते, याचमुळे त्यांच्या अनुभवी आणि विकासनशील विचारांचा जनतेला फायदा करून देण्यासाठी मोदींनी त्यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्री बनवले केंद्रात सत्ता आल्यानंतर साहेबांनी सुरुवातीलाच धनगर आरक्षणाचा मुद्धा हाती घेत त्यासाठी आवश्यक गोष्टींच्या तरतुदी करण्यास सुरुवात केली पण दुर्दैवाने साहेबांचे अपघाती निधन झाले आणि परत धनगर आरक्षणाचा प्रश्न रखडला गेला.....!
मुंडे साहेबांच्या हयातीत उदयास आलेले राष्टीय समाज पक्षाचे धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना राजकारणात सक्रिय होण्यासाठी मुंडे साहेबांची साथ,मार्गदर्शन तसेच आशीर्वाद लाभले कसल्याच प्रकारचा मतभेद हेवेदावे न करता साहेबांनी महादेव जाणकरांना राजकारणाचे बाळकडू पाजले याचेच फलित म्हणजे आज जानकर हे एक समाजाबद्दल विकसनशील दृष्टी ठेवणारे उच्च नेतृत्व बनलेले आहेत..
स्वपक्षात धनगर समाजाचा चेहरा असावा ज्याला समाजाच्या समस्यांची पूर्ण जाणीव असावी जो व्यक्ती जमिनीवर राहून धनगर समाजाचे नेतृत्व करू शकेल अशी दूरदृष्टी ठेवत मुंडे साहेबांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज पण राजकारणाचा कसलाच अनुभव नसलेले प्राध्यापक म्हणुन कार्यरत असलेले राम शिंदे यांच्यावर हात ठेवत त्यांना राजकारणात आणले पंचायत समिती सदस्य ते आमदार बनवत साहेबांनी राम शिंदे रुपी एक नवीन नेतृत्व धनगर समाजाला मिळवून दिले....!
या तिन्ही समाजाचे नेतृत्व करत असताना मुंडे साहेबांनी कसलाच भेदभाव न ठेवता संपूर्ण आयुष्य या समाजाच्या विकासाठी खर्ची केले मुंडे साहेब जगले ते फक्त ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांची कोणी वाणी अश्या लोकांसाठी त्यांच्या पश्चात या समाजाचा कोणीतरी वाली असावा यासाठी त्यांनी जिवंतपणीच या समाजासाठी नेतृत्व निर्माण करत त्यांना खतपाणी घालत हुशार आणि तेजस्वी तसेच आक्रमक बनवण्याचे काम केले त्यातुनच आज या समाजांना पंकजाताई रुपी आभाळा एवढं सक्षम असे नेतृत्व प्राप्त झालेले आहे या नेतृत्वाला साथ मिळते ती साहेबांच्या दोन्ही मानसपुत्रांची ते म्हणजे महादेव जानकर आणि राम शिंदे यांची....!
स्वपक्षात धनगर समाजाचा चेहरा असावा ज्याला समाजाच्या समस्यांची पूर्ण जाणीव असावी जो व्यक्ती जमिनीवर राहून धनगर समाजाचे नेतृत्व करू शकेल अशी दूरदृष्टी ठेवत मुंडे साहेबांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज पण राजकारणाचा कसलाच अनुभव नसलेले प्राध्यापक म्हणुन कार्यरत असलेले राम शिंदे यांच्यावर हात ठेवत त्यांना राजकारणात आणले पंचायत समिती सदस्य ते आमदार बनवत साहेबांनी राम शिंदे रुपी एक नवीन नेतृत्व धनगर समाजाला मिळवून दिले....!
या तिन्ही समाजाचे नेतृत्व करत असताना मुंडे साहेबांनी कसलाच भेदभाव न ठेवता संपूर्ण आयुष्य या समाजाच्या विकासाठी खर्ची केले मुंडे साहेब जगले ते फक्त ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांची कोणी वाणी अश्या लोकांसाठी त्यांच्या पश्चात या समाजाचा कोणीतरी वाली असावा यासाठी त्यांनी जिवंतपणीच या समाजासाठी नेतृत्व निर्माण करत त्यांना खतपाणी घालत हुशार आणि तेजस्वी तसेच आक्रमक बनवण्याचे काम केले त्यातुनच आज या समाजांना पंकजाताई रुपी आभाळा एवढं सक्षम असे नेतृत्व प्राप्त झालेले आहे या नेतृत्वाला साथ मिळते ती साहेबांच्या दोन्ही मानसपुत्रांची ते म्हणजे महादेव जानकर आणि राम शिंदे यांची....!
साहेबांच्या निधनानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर आरक्षणाच्या प्रलंबीत प्रश्नाचे भांडवल करत देवेंद्र फडणवीस सत्तेत आले खरे पण धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे वचन अदयाप त्यांनी पूर्ण केलेले नाही..!
पंकजाताईंनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार मुख्यमंत्र्यांशी व केंद्र सरकारशी चर्चा केली पण आरक्षणाचे श्रेय पंकजाताईंच्या पदरी पडेल या भीतीने आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचे दिसते..
आरक्षणाच्या बाबतीत अंतर्गत आणि विपक्षीय नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत पंकजाताईं एकाकी झुंज देत असल्याचे पाहायला मिळते.
पंकजाताईंमुळे धनगर समाजाच्या दोन प्रमुख नेत्यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाले तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्तेत असताना देखील पंकजाताईंना सरकारसोबत संघर्ष करावा लागत आहे हे नक्की....!
पंकजाताईंनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार मुख्यमंत्र्यांशी व केंद्र सरकारशी चर्चा केली पण आरक्षणाचे श्रेय पंकजाताईंच्या पदरी पडेल या भीतीने आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचे दिसते..
आरक्षणाच्या बाबतीत अंतर्गत आणि विपक्षीय नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत पंकजाताईं एकाकी झुंज देत असल्याचे पाहायला मिळते.
पंकजाताईंमुळे धनगर समाजाच्या दोन प्रमुख नेत्यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाले तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्तेत असताना देखील पंकजाताईंना सरकारसोबत संघर्ष करावा लागत आहे हे नक्की....!
माळी समाजाचे एक हाती नेतृत्व असेलेले छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षाने संगममताने एका प्रकरणात अडकवून माळी समाजात फूट पाडायचा डाव आखला असताना वेळीच पक्षाविरोधात जाऊन पंकजाताईंनी छगन भुजबळांची हॉस्पिटल मध्ये भेट घेत नवीन समीकरण आखत माळी समाजाला विखरू पाहणाऱ्या विषारी प्रवृत्तीला जागीच आळा देऊन या समाजातील लोकांचे स्थैर्य टिकऊन ठेवायचे महत्वपूर्ण काम केले....
माळी समाजाने जेवढे प्रेम साहेबांवर केले तेवढेच प्रेम आणि विश्वास पंकजाताईंवर टाकत त्यांच्या नेतृत्वाला एकमान्यता देत समाजा प्रति नवीन आशा पल्लवित केलेल्या आहेत....!
माधव समाजाची असलेली ही वज्रमुठ महाराष्टाच्या राजकारणाची दिशा बदलू शकते या वज्रमुठीची साथ पंकजाताईं सोबत असल्या कारणाने स्वपक्षीय आणि विपक्षीय नेते यात राजकारण करू पाहत आहेत भगवानगडावर होणाऱ्या मार्गदर्शनरुपी भाषणाला पंकजाताईंना झालेला विरोध तसेच चोंडी येथे साजरी होणारी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला महादेव जानकर यांना होणारा विरोध हा स्वपक्षीय आणि विपक्षीय नेत्यांच्या कपटीरुपी असलेल्या राजकारणाचा एक भाग आहे..माधव समाजामध्ये आपआपसात असलेल्या एकीमुळे असल्या कपटी कारस्थानी राजकारणाला इथे थारा मिळणार नाही हे प्रत्येक वेळी सर्व समाजाच्या जनतेने एकत्र येऊन दाखवून दिलेले आहे मग तो दसरा मेळावा (सावरगाव घाट) असो किंवा आझाद मैदान (मुंबई) येथे साजरी होणारी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असो येथे जमा होणारा असंख्य सर्व जाती धर्माचा समुह हेच दर्शवतो की "आंखे खोल के देखो जनता किस के साथ है"....!
माळी समाजाने जेवढे प्रेम साहेबांवर केले तेवढेच प्रेम आणि विश्वास पंकजाताईंवर टाकत त्यांच्या नेतृत्वाला एकमान्यता देत समाजा प्रति नवीन आशा पल्लवित केलेल्या आहेत....!
माधव समाजाची असलेली ही वज्रमुठ महाराष्टाच्या राजकारणाची दिशा बदलू शकते या वज्रमुठीची साथ पंकजाताईं सोबत असल्या कारणाने स्वपक्षीय आणि विपक्षीय नेते यात राजकारण करू पाहत आहेत भगवानगडावर होणाऱ्या मार्गदर्शनरुपी भाषणाला पंकजाताईंना झालेला विरोध तसेच चोंडी येथे साजरी होणारी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला महादेव जानकर यांना होणारा विरोध हा स्वपक्षीय आणि विपक्षीय नेत्यांच्या कपटीरुपी असलेल्या राजकारणाचा एक भाग आहे..माधव समाजामध्ये आपआपसात असलेल्या एकीमुळे असल्या कपटी कारस्थानी राजकारणाला इथे थारा मिळणार नाही हे प्रत्येक वेळी सर्व समाजाच्या जनतेने एकत्र येऊन दाखवून दिलेले आहे मग तो दसरा मेळावा (सावरगाव घाट) असो किंवा आझाद मैदान (मुंबई) येथे साजरी होणारी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असो येथे जमा होणारा असंख्य सर्व जाती धर्माचा समुह हेच दर्शवतो की "आंखे खोल के देखो जनता किस के साथ है"....!
माळी धनगर वंजारी(माधव) या समाजाच्या एकी मध्ये विष कालवून कपटी कारस्थानी राज्यकर्त्यांना हा माधव समाज महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही..
मुंडे साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिलेला माधव समाज आज पंकजाताईंच्या रुपी निर्माण झालेल्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहणार यासाठी वचनबद्ध झालेला आहे....!
मुंडे साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिलेला माधव समाज आज पंकजाताईंच्या रुपी निर्माण झालेल्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहणार यासाठी वचनबद्ध झालेला आहे....!
सत्ता परिवर्तनामुळे राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी मंत्री अजित पवार यांचे डोके ठिकाण्यावर आलेले आहे धनगर आणि वंजारी हे दोन समाज घटक राष्ट्रवादीची सत्ता जाण्यासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी एका पत्रकारपरिषदे मध्ये जाहीर सांगितले....
प्रस्थापित सरकारच्या विरोधात लढा देत बी.के.कोकरे या उमदा नेतृत्वाने धनगर समाजाच्या पदरात आरक्षण पाडून दिले होते या संपूर्ण गोष्टींचा इतिहास माहिती नसलेले व नेहमी सत्तेचा गैरवापर करत सतत धनगर वंजारी माळी व इतर बहुजन समाजावर अन्याय करणारे अजित पवार यांनी धनगर आरक्षणाचे श्रेय पुण्यात पत्रकारपरिषदे मध्ये शरदरावांना देऊन सत्तापरिवर्तनामुळे स्वतःची मतीभ्रष्ट झाल्याचे दाखऊन दिले....!
प्रस्थापित सरकारच्या विरोधात लढा देत बी.के.कोकरे या उमदा नेतृत्वाने धनगर समाजाच्या पदरात आरक्षण पाडून दिले होते या संपूर्ण गोष्टींचा इतिहास माहिती नसलेले व नेहमी सत्तेचा गैरवापर करत सतत धनगर वंजारी माळी व इतर बहुजन समाजावर अन्याय करणारे अजित पवार यांनी धनगर आरक्षणाचे श्रेय पुण्यात पत्रकारपरिषदे मध्ये शरदरावांना देऊन सत्तापरिवर्तनामुळे स्वतःची मतीभ्रष्ट झाल्याचे दाखऊन दिले....!
अजित पवारांना धनगर माळी आणि वंजारी समाजा मध्ये असलेल्या वज्रमुठीची भीती वाटत असल्याचे समजून येते, माळी धनगर व वंजारी हे समाजघटक महाराष्ट्राच्या राजकारणाचा "पाया" असल्याची जाणीव आज अजित पवारांना झाल्याची दिसते. एवढेच नाहीतर या समाजामध्ये फूट पाडून स्वतःचे राजकारण टिकवण्याचा प्रयत्न अजित पवार करत असल्याचे पाहायला मिळत आहे नेहमी मराठात्तोर इतर समाजाला हीन दर्जाची वागणूक देणाऱ्या अजित पवारांना या समाजाबद्दल कपटी सहानुभूती निर्माण होणे म्हणजे कुठेतरी संशयास्पद वाटते.या समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते व त्यांचे कार्यकर्ते सज्ज झाल्याचे दिसून येत आहे...
त्याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे दादाहरी मुंडे हे प्याद कोणाचं आहे हे अदयाप समजले नसले तरी या समाजकंठकाणे दसरा मेळाव्याचे औचित्य साधत धनगर समाजाचे मंत्री राम शिंदे यांच्या बाबतची वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण सोसिएल मीडिया च्या माध्यमातून पसरविण्याचे काम केले यामध्ये "मीच मुंडे साहेबांचा वारसदार अश्या आशयाचे राम शिंदे यांचे वक्तव्य होते.अश्या वक्तव्याच्या बातमीमुळे वंजारी समाजाचा रोष राम शिंदे वर येऊन त्यांची प्रतिमा या समाजात मलिन व्हावी यासाठीचे प्रयत्न करण्यात आले.याचा परिणाम दसरा मेळाव्यात दिसून आला राम शिंदे भाषणाला उभे राहताच कार्यकर्त्यांमधून विरोधात घोषणाबाजी करण्यात आली...
या बातमी संदर्भात माहिती देत राम शिंदे यांनी दादाहरी मुंडे या समाजकंठकाचे नाव घेत यामागे त्याचा असलेला हेतु स्पष्ट करत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला होता..
वंजारी माळी आणि धनगर समाजाची ताकद पंकजाताईंच्या पाठीमागे असल्याकारणाने ताईंचे नेतृत्व आज मुख्यमंत्री पदा पर्यंत पोहचलेले आहे असे म्हणत राम शिंदे यांनी आम्ही ताईसाहेबांचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे सिद्ध केलेले आहे.पंकजाताई मुंडे या नेतृत्वाचे अधःपतन करण्या हेतूने स्वपक्षीय तसेच विपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे या गोष्टींमार्फत समजून येते.....!
त्याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे दादाहरी मुंडे हे प्याद कोणाचं आहे हे अदयाप समजले नसले तरी या समाजकंठकाणे दसरा मेळाव्याचे औचित्य साधत धनगर समाजाचे मंत्री राम शिंदे यांच्या बाबतची वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण सोसिएल मीडिया च्या माध्यमातून पसरविण्याचे काम केले यामध्ये "मीच मुंडे साहेबांचा वारसदार अश्या आशयाचे राम शिंदे यांचे वक्तव्य होते.अश्या वक्तव्याच्या बातमीमुळे वंजारी समाजाचा रोष राम शिंदे वर येऊन त्यांची प्रतिमा या समाजात मलिन व्हावी यासाठीचे प्रयत्न करण्यात आले.याचा परिणाम दसरा मेळाव्यात दिसून आला राम शिंदे भाषणाला उभे राहताच कार्यकर्त्यांमधून विरोधात घोषणाबाजी करण्यात आली...
या बातमी संदर्भात माहिती देत राम शिंदे यांनी दादाहरी मुंडे या समाजकंठकाचे नाव घेत यामागे त्याचा असलेला हेतु स्पष्ट करत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला होता..
वंजारी माळी आणि धनगर समाजाची ताकद पंकजाताईंच्या पाठीमागे असल्याकारणाने ताईंचे नेतृत्व आज मुख्यमंत्री पदा पर्यंत पोहचलेले आहे असे म्हणत राम शिंदे यांनी आम्ही ताईसाहेबांचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे सिद्ध केलेले आहे.पंकजाताई मुंडे या नेतृत्वाचे अधःपतन करण्या हेतूने स्वपक्षीय तसेच विपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे या गोष्टींमार्फत समजून येते.....!
माळी धनगर आणि वंजारी समाजाची असलेली वज्रमुठ सैल करण्याच्या प्रयत्नात असलेले सर्वपक्षीय नेत्यांना कल्पना नसावी की तुम्ही जेवढं वज्रमुठीला सैल करायला जाताल ती मूठ तेवढीच जास्त घट्ट होऊन उद्या महाराष्ट्राला पहिली महिला बहुजन मुख्यमंत्री होण्याचा बहुमान पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मिळवून देणार आहे....!